ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम हे अचानकपणे राजकारणात कसे आले ?
Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात सगळेच पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही जुने जाणते राजकारणी तर काही नवे चेहरे या राजकारणात दिसतात. असाच राजकारणातील नवा चेहरा म्हणजे उज्ज्वल निकम… ते राजकारणात का आले? वाचा सविस्तर…
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम हे अचानकपणे राजकारणात कसे आले? यावर ते बोलते झाले. 15 दिवसांआधी राजकारणात येण्याबाबत भाजपकडून विचारण्यात आलं. तुम्ही राजकारणात यावं आणि उत्तर-मध्य मुंबईतून भाजपचे उमेदवार म्हणून लढावं म्हणून विचारण्यात आलं. तेव्हा मी राजकारणात येण्यासाठी सकारात्मक नव्हतो, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
भाजपकडून लोकसभा लढण्याविषयी विचारण्यात आल्याचं मी घरी सांगितलं. तेव्हा त्यांनी मला यावर विचार करावा, असं सुचवलं. मीही विचार केला. घरात बोललो. आमच्या घरातच लोकशाही पद्धतीने मतदान झालं. तेव्हा निवडणूक लढवावी, याला बहुमत मिळालं. मी राजकारणात येण्यासाठी फारसा सकारात्मक नव्हतो. पण मग घरच्यांचं राजकारणाात जाण्यासाठी एकमत असल्याने मी राजकारणात आलो आणि आता लोकसभा निवडणूक लढवतो आहे, असं उज्ज्वल निकम म्हणाले.काही वर्षांआधी देखील मला राजकारणात येण्याबाबत एका राजकीय पक्षाने विचारलं होतं. पण तेव्हा मी विचार करून कळवतो, असं म्हटलं. पण तेव्हा मी राजकारणात आलो नाही. तेव्हा मी राजकारणात येण्यासाठी सकारात्म नव्हतो, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
उत्तर-मध्य मुंबईत भाजपकडून उज्ज्वल निकम तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड निवडणूक लढवत आहेत. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत होणार आहे. उत्तर-मध्य मुंबईत कोण जिंकणार याची अनेकांना उत्सुकता आहे. 4 जूनला निकाल लागल्यानंतर याचं उत्तर मिळणार आहे.
More Stories
नाशिक(Nashik):नाशिकमध्ये जोरदार पाऊस! गोदावरीच्या पाणीपातळ्यात वाढ, 9 धरणांमधून विसर्ग सुरु
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!