devendra fadnavis : राज्यात सत्ताधारी महायुतीची धुळदाण उडाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांसह सरकारमध्येही सुद्धा एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महायुतीच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी घेत पदातून मुक्तता करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणीस यांनी पदातून मुक्तता करण्याची मागणी करतानाच पक्ष संघटनेसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या निर्णयाला राज्यातील नेत्यांनी विरोध करत पराभवाची सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.