जालना मतदार संघ कसा आहे

जालना लोकसभा मतदार संघ महाराष्ट्रातील 48 मतदार संघांपैकी एक आहे. हा मतदार संघ महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आणि मराठवाडा विभागाच्या उत्तर दिशेला आहे. जालना पूर्वी निजामशाहीचा एक भाग होता आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामानंतर संभाजीनगर ( तेव्हाचे औरंगाबाद ) तालुका म्हणून भारताचा एक भाग बनला.

मतदार संघाचे स्थान काय 

जालना जिल्ह्याच्या पूर्वेस परभणी आणि बुलढाणा, पश्चिमेस औरंगाबाद, उत्तरेस जळगाव आणि दक्षिणेस बीड या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7612 चौ. किलोमीटर, जे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.47 टक्के आहे. जिल्ह्याचे मुख्यालय जालना येथे आहे आणि ते राज्याची राजधानी आणि राष्ट्रीय राजधानीशी ब्रॉडगेज रेल्वे मार्गांनी जोडलेले आहे.

निवडणूकीचा इतिहास 

जालना मतदारसंघात 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसचे हनुमंतराव गणेशराव वैष्णव खासदार म्हणून निवडून आले. 1957 मध्येही काँग्रेसची सत्ता राहिली आणि सैफ तैयबजी खासदार झाले. त्यानंतर 1957 मध्ये येथे पोटनिवडणूक झाली आणि पीझंट अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाचे ए.व्ही. घारे खासदार म्हणून निवडून आले. 1960 च्या निवडणुकीत काँग्रेसचे रामराव नारायण राव खासदार झाले. 1967 मध्ये काँग्रेसचे व्ही.एन.जाधव आणि 1971 मध्ये बाबुराव काळे खासदार म्हणून निवडून आले.

1989 मध्ये भाजपचा पुन्हा प्रवेश

1977 च्या निवडणुकीत जनता पक्षाचे पुंडलिक हरी दानवे खासदार म्हणून निवडून आले. 1980 ते 1984 पर्यंत ही जागा काँग्रेसकडे राहिली आणि बाळासाहेब पवार खासदार होते. 1989 मध्ये भाजपचे पुंडलिक हरी दानवे पुन्हा खासदार झाले. 1991 च्या निवडणुकीत ही जागा पुन्हा काँग्रेसकडे गेली आणि अंकुशराव टोपे खासदार झाले. 1996 आणि 1998 मध्ये भाजप पुन्हा आले आणि उत्तमसिंह पवार खासदार झाले. तेव्हापासून ही जागा भाजपकडेच राहिली. रावसाहेब दानवे 1999 पासून खासदार आहेत.

2019 मध्ये दोन टक्के कमी मतदान झाले 

2019 मध्ये जालना लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. त्यावेळी 64.50 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये मतदानाची टक्केवारी दोन टक्क्यांनी कमी झाली. या जागेवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे, काँग्रेसचे विलास औताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे यांच्यात तिरंगी लढत होती.

निवडणुकीत दानवे यांना 6,98,019 तर विलास औताडे यांना 3,65,204 मते मिळाली. तसे पाहिले तर भाजप उमेदवाराचा 3,32,815 मतांनी विजय झाला. निवडणुकीत 12,09,096 मतदारांनी आपला हक्क बजावला होता.

You may have missed