लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी शेवटचा एक दिवस राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची मनमाडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे “बीड जिल्ह्याची निवडणूक मी कशी लढले? हे सर्वांना माहिती आहे”, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं. मात्र, त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कोणाकडे आहे, याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.