Maharashtra Lok Sabha : आदित्य ठाकरेंनी कल्याण किंवा ठाण्यातून निवडणूक का लढवली नाही?

Aaditya Thackeray Latest News : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना ठाण्यातून निवडणूक लढवण्याचे आव्हान देते होते, पण लोकसभेच्या निमित्ताने संंधी असूनही रिंगणात का उतरले नाही?

Aaditya Thackeray Lok Sabha Election : एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांनी आणि काही खासदारांनी बंडखोरी केल्यापासून आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना निवडणूक लढवण्याचे आव्हान देत आहेत. शिंदेंनी राजीनामा द्यावा, मी त्यांच्याविरोधात ठाण्यातून निवडणूक लढतो किंवा त्यांनी वरळीतून लढावी, असे आदित्य ठाकरे म्हणतात. श्रीकांत शिंदेंनीही आदित्य ठाकरेंना कल्याणमधून लढण्याचे प्रतिआव्हान दिले होते. हाच प्रश्न जेव्हा आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा ते काय म्हणाले? (Why did Aditya Thackeray not contest from Kalyan Lok Sabha or Thane Lok Sabha constituency?)आदित्य ठाकरेंनी  मुलाखत दिली. ठाणे किंवा कल्याणमधून लोकसभा निवडणुकीला उभे का राहिला नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

 

आदित्य ठाकरेंनी काय दिले उत्तर?

या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “पिक्चर अभी बाकी है! लोकसभा हा एक आवडता प्लॅटफॉर्म आहेच, तुम्ही तिथे जे बोलता ते देशभर जाते. मात्र, त्याच बरोबरीने आपला महाराष्ट्र आहे. सध्याच्या स्थितीत तरी महाराष्ट्रात मी काम करणे योग्य आहे.”

“तुम्ही भाजपलाच संपवले”, आदित्य ठाकरे असं का म्हणाले?

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, “पंकजाताईंना आता उमेदवारी दिली. तरीही त्यांच्या मनात काय खदखद आहे, हे त्यांनी विचारा. पूनमताई कुठे आहेत, ते विचारा. प्रकाश मेहता कुठे आहेत. राज पुरोहित कुठे आहेत. एकनाथ खडसेंच्या बाबतीत काय केले? दोन पक्ष संपवून मी आलो, असे तुम्ही (देवेंद्र फडणवीस) म्हणालात, पण त्या प्रयत्नात तुम्ही भाजपलाच संपवले”, असा टोला आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.

You may have missed