आम्हाला सगळं लक्षात येईपर्यंत..

“आम्हाला हा सगळा प्रकार निवडणूक काळात लक्षात आलं. निवडणूक प्रक्रिया इतकी वेगात होते त्यामुळे जोपर्यंत लक्षात येतं तोपर्यंत काही गोष्टी घडून गेलेल्या असतात. बंडखोरीही झाली होती. मी ९० ते ९५ टक्के भाजपाचे बंडखोर मागे घेतले. उद्धव ठाकरे फक्त फोन लावायचे पण बंडखोर एकही परत घेतला नाही. मग ते काय बोलायचे?” असाही सवाल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मोदी लाट का दिसत नाही? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मोदी लाट का दिसत नाही? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणूक देशाची आहे, त्यामुळे आम्ही मोदींच्या नावेच मतं मागणार, एनडीएचं कुणीही निवडून आलं तरीही त्याचं मत हे मोदींनाच मिळणार आहे. यूपीएचं कुणी निवडून आलं तर त्याचं मत हे राहुल गांधींना मिळणार आहे. असं आपण समजू कारण त्यांचा नेता अद्याप ठरलेला नाही. निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच आहे. शांतपणे निवडणूक चालली आहे असं जे वाटतं आहे तर त्याचं कारण आहे. २०१४ मध्ये एका आशा असलेला मतदार होता त्याने मोदींना मतदान केलं. २०१९ मध्ये मतदारांनी पाच वर्षांमधलं काम पाहिलं आणि मतदान केलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हा मतदार भाजपाचा मतदार झाला आहे त्यामुळे जो तुमचा मतदार असतो तो शांतपणे मतदान करतो. आमचे मतदार जे आहेत त्यांच्या मनात हे पक्कं आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये लाट होती आत्ता दिसत नाही ही चर्चा होते, याचं कारणच ते आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.