लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी शेवटचा एक दिवस राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची मनमाडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे “बीड जिल्ह्याची निवडणूक मी कशी लढले? हे सर्वांना माहिती आहे”, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं. मात्र, त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कोणाकडे आहे, याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
More Stories
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध; ठाकरे गट-भाजप आमनेसामने, रामा हॉटेलबाहेर तुफान राडा
नवी दिल्ली(New Delhi):संसदेत आज अर्थसंकल्पावरुन घमासान, राहुल गांधी काय बोलणार?
केंद्रीय अर्थसंकल्प(Union Budget 2024):विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?